पाणी मराठी निबंध | Water Essay In Marathi Best 100 Words

WhatsApp Group Join Group

या पोस्ट मध्ये पाणी मराठी निबंध लेखन | Water Essay In Marathi 100 शब्दांमध्ये करणार आहोत

Water Essay In Marathi

Water Essay In Marathi
निबंध लेखन –  पाणी

[मुद्दे : पाण्याला जीवन म्हणतात, एवढे पाण्याचे महत्त्व – पाणी निसर्गाची देणगी – म्हणून पाण्याची किंमत वाटत नाही पाण्याचा अभाव पाण्याविना शेती अशक्य – पाण्याचा प्रश्न जागतिक महत्त्वाचा पावसाचे पाणी जमिनीत मुखले पाहिजे.]

पाणी म्हणजेच जीवन! ‘जीवन’ या नावातच पाण्याचे महत्त्व दडलेले आहे. पाणी ही आपल्याला निसर्गाकडून मिळालेली भेट आहे. त्यामुळे पुष्कळ वेळा आपल्याला त्याची किंमत कळत नाही आणि मग आपल्याकडून पाण्याचा अपव्यय होतो. पाणी फार मौल्यवान आहे, ते जपून वापरले पाहिजे. पाणी नसले तर काय होईल, याची कल्पना दुष्काळातच येते.

तहान लागली असताना पाणी मिळाले नाही की, डोळ्यांत पाणी उभे राहते! खेडोपाडी पाण्यासाठी लोकांना डोक्यावर हंडे, कळश्या घेऊन अनेक मैल हिंडावे लागते. पाण्याविना शेती फुलत नाही. आता जगात सगळीकडेच पाण्याचा प्रश्न उभा आहे. कारण पृथ्वीवरील माणसांना आवश्यक आहे, एवढा पाण्याचा साठा उरला नाही.

पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खालावत आहे. आकाशातून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न हा पाणीसंचयाचाच भाग आहे. पाणी आपण वाचवले पाहिजे. ते जमिनीत मुरवले पाहिजे. तरच यापुढे माणसाचा टिकाव लागणार आहे.

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • जल पाणी मराठी निबंध दाखवा / Pani Marathi Nibandh Dakhva
  •  पाणीवर मराठी निबंध सांगा / Water Essay in Marathi 100 words
  • पाण्यावर मराठी निबंध लेखन / Essay on Water In Marathi 

हे पण वाचा

तुम्हाला पाणी मराठी निबंध लेखन / Water Essay In Marathi कसे वाटले ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा धन्यवाद,

WhatsApp Group Join Group

Comments are closed.

x