पंडित जवाहरलाल नेहरू भाषण मराठी | Pandit Jawaharlal Nehru Speech In Marathi

WhatsApp Group Join Group

मित्रांनो या लेखा मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू मराठी भाषण | Pandit Jawaharlal Nehru Speech In Marathi यांच्यावर भाषण घेऊन आलो आहोत, हे भाषण शेवट पर्यंत नक्की वाचा.

Pandit Jawaharlal Nehru Speech In Marathi

Pandit Jawaharlal Nehru Speech In Marathi

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी भाषण

पं. जवाहरलाल नेहरू प्रगल्भ बुद्धिमत्ता, प्रचंड श्रीमंती, ऐश्वर्यसंपन्न असणाऱ्या घरामध्ये ज्यांचा जन्म झाला, महात्मा गांधींनी ज्यांचा उल्लेख माझ्या विचाराचा ठार म्हणू केला, ज्यांना संपूर्ण जगाने शांतिदूत ही पदवी बहाल केली , पंचशील तत्त्वाचे खंदे समर्थक, अलिप्तावादी चळवळीचे प्रणेते म्हणून ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो त्या महापुरुषाचे नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू. षा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद या ठिकाणी झाला. पंडित नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू हे निष्णांत कायदेपंडित म्हणून प्रसिद्ध होते. भारतातील उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपले उच्च शिक्षण लंडन येथे केले. १९१२ साली बॅरिस्टर पदवी प्राप्त करून भारतात आगमन केले.

१९१६ साली कमला कौल यांच्याशी विवाह केला. १९२० साली देशात राष्ट्रीय चळवळीचे वारे वाहत असताना सारा देश देशप्रेमावर एकत्र येत होता. परकीय सत्तेचा कडाडून विरोध करत होता. अशाच कालखंडात ब्रिटिशांच्या विरोधात देशात एक वातावरण निर्माण होत होते. या कालखंडात नेहरूनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळीत उडी घेतली. १९२१ साली प्रिन्स ऑफ वेल्स जेव्हा भारतात येणार होता तेव्हा त्याच्यावरती बहिष्कार टाकण्यात आला. तेव्हा. त्यांना ६ महिने तुरुंगाची शिक्षा भोगावी लागली. १९३० साली गांधीर्जीसमवेत मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले. १९३६, १९३७ च्या या दोन्ही काँग्रेसच्या. अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले . (pandit jawaharlal nehru bhashan marathi)

१९४२ साली देशात ”चले जाव चा नारा” मोठ्या प्रमाणात दिला. देशातून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.’ तेव्हा नेहरू व त्यांच्या सहकाऱ्यांना ल किल्ल्यात डांबले. तुरुंगात असताना त्यांनी “डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. १९४५ साली त्या ग्रंथाचे प्रकाशन केले. १९४७ साली देशात चळवळीचे वारे वाहत होते. अशाच कालखंडात ब्रिटिशांनी भारतीय सत्ता भारतीयांना दिली. १५ ऑगस्ट १९४७ पहाट उगवली. महापुरुषाच्या प्रयत्नाने स्वातंत्र्याच्या चळवळीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले. (jawaharlal nehru marathi bhashan)

१५ ऑगस्टला पंडित नेहरूंनी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्राला अभिप्रेत असणारे भाषण करताना पंडित नेहरू म्हणाले मला हा देश शेतकरी, कष्टकरी, श्रमिक यांच्या प्रयत्नातून व बुद्धिजीवी लोकांच्या कल्पनेतून साकार करावयाचा. त्यासाठी मला आपल्या सर्वांची साथ हवी आहे. नेहरूंचे हे भाषण सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारे होते. पुढे नेहरू असे म्हणाले, या देशामध्ये हरितक्रांती करून भारतीय शेती शेतकऱ्याचा विकास करावयाचा आहे आणि शेतकऱ्याचा विकास करून मला भारताला सक्षम देश उभा करावयाचा आहे. असेच सक्षम भारत निर्माण करण्यासाठी नेहरूंनी प्रामुख्याने प्रयत्न केले. मुला फुलांचे नेहरू… चाचा नेहरू चाचा नेहरू!’*

आजही नेहरूंचा जन्मदिवस साजरा करताना आपण बालदिन म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरूंना लहान मुले फार आवडत असत. याच बालकांतून उद्याच्या तरुणांची निर्मिती होणार आहे. बालकांच्यासमोर सकारात्मक दृष्टिकोणातून पाहून उद्याच्या राष्ट्राची निर्मिती त्यांच्या हातातूनच निर्माण होणार आहे हा विचार आमच्या समोर ठेवण्याचे कार्य जवाहरलाल नेहरूनी केलेले पाहावयास मिळते. १९५५ साली रशियाचा दौरा केला. भारतरत्न हा किताब देशवासीयांनी अर्पण केला. १९५७ दुसऱ्यांदा पंतप्रधान, १९६९ साली स्टडी ऑफ द नेहरूज हा रफिक झकेरिया यांनी ग्रंथ संपादित केला. १९६० च्या महाराष्ट्र राज्य स्थापनेतही नेहरूंचे योगदान आहे. शेजारी असणाऱ्या राष्ट्रांना वेळोवेळी भेट देऊन त्या राष्ट्रांना सहकार्य करण्याची भावना नेहरूंच्यामध्ये होती. (pandit nehru bhashan marathi 2,3,4,5 minutes)

तिसऱ्या जगाचा शोध घेणारे नेहरू जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती राष्ट्राच्या मोठ्या प्रमाणात घेत असणारी. नुकसान विघटनवाद संपवण्यासाठी असेल. त्यांनी अलिप्ततावाद चळवळीची स्थापना केली. बेलग्रेड या ठिकाणी १९६१ साली सहभाग घेतला. १९६२ साली पुनश्च पंतप्रधानपदी पंडितजींची निवड झाली देशाला हरित क्रांतीच्या दिशेने नेण्यासाठी वेगवेगळ्या जागतिक पातळीवरची योजना ‘ अमलात आणल्यामुळे माणुसकी व मानवतेचा स्वीकार करणारा आधुनिक शांतीदूत म्हणून नेहरूंचा उल्लेख केला जातो. नेहरू हे जितके हळवे आणि संयमी होते तितकेच ते स्पष्टवकतेही होते. भारतीय लोकशाहीचे नेतृत्व करतात. देशातील सवोच्च पदी असताना देशात शांतता प्रस्थापित करताना सनदशीर मार्गानी वल्लभभाई पटेल तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आणि संरक्षण मंत्र्यांच्या मदतीने सर्व संस्थानांचे विलीनीकरण योग्य पद्धतीने करून घेतले.

देशातील अराजकता, फुंटिरता नष्ट करण्यासाठी शांतता हेच एकमेव माध्यम आहे हे जनतेच्या आणि संस्थानिकांच्या लक्षात आणून दिले. उत्तम पालक आणि उत्तम प्रशासक याचे दर्शन नेहरूंच्या पत्र लिखाणातून पाहावयास मिळते. १९३०-१९५५ या कालखंडांत आपल्या बहिणीला लिहिलेली पत्रे त्याचबरोबर तुरुंगातच असताना आपल्या मुलीला केलेला पत्रव्यवहार आजही एक आदर्श पत्र म्हणून ती आपणास पाहावयास मिळतात. प्रतिभासंपन्न नेहरूंचे दर्शन या पत्रातून पाहावयास मिळते . सार्वजनिक जीवनात लढा देणारा आणि तुरुंगवासाची शिक्षा भोगणारा माणूस हळव्या मनाचाही असतो याचे दर्शन त्यांच्या पत्रातून दर्शन होते. नेहरू सतत म्हणत माझ्या विचारांची माणसे या राष्ट्रात निर्माण व्हावीत. त्यातून एक देशप्रेमाची, विचाराची तरुणांची निर्मिती होईल असे नेहरूंना वाटत असे. (pandit jawaharlal nehru bhashan in marathi)

१९६४ च्या भुवनेश्‍वरच्या अधिवेशनात नेहरूंना पक्षघाताचा झटका आला आणि पंडित नेहरू यांचा २७ मे १९६४ रोजी मृत्यू झाला. आजही नेहरू मनमिळावू नेहरू म्हणून आपणास त्यांच्या विचारांची प्रचिती पाहावयास मिळते. महालामध्ये रममाण होण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेत सामील होऊन स्वातंत्र्याची पताका खांद्यावरती घेणारा एक झंजावाती तरुण म्हणजे नेहरू. देशातील निरक्षरता, अज्ञान, परंपरा, रूढी नष्ट करून वैज्ञानिक दृष्टिकोणाला साथ घालणारा, विज्ञानाची गीतं गाणारा हा महामानव खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकारच आहेत. त्यांचाच जन्मदिन आपण नेहमी बालदिन म्हणून साजरा करतो.

जय हिंद जय भारत !


आम्हाला आशा आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वरील भाषण 2,3,4,5 मिनिटे | Speech On Pandit Jawaharlal Nehru In Marathi हे भाषण नक्की आवडले असेल, धन्यवाद

WhatsApp Group Join Group